आषाढ अमावास्या विशेष: दीपपूजन आणि जिवती पूजनाची अर्थपूर्ण परंपरा

 

🪔 आषाढ अमावास्या विशेष: दीपपूजन आणि जिवती पूजनाची अर्थपूर्ण परंपरा

आषाढ महिन्याच्या अमावस्येला एक पवित्र, अर्थपूर्ण परंपरा साजरी केली जाते – दीपपूजन आणि जरा-जिवंतिका पूजन.

दिवा हे ज्ञानाचं आणि वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जसं एक दिवा हजारो दिवे उजळवू शकतो, तसंच आपल्यातून पुढच्या पिढ्यांपर्यंत प्रकाशाचा, संस्कारांचा प्रवाह सुरू राहतो. म्हणूनच दिव्याचं पूजन म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि वंशवृद्धीचा सन्मान!

🪔 दीपपूजन केवळ एक धार्मिक विधी नाही – तर हा आहे एक संस्कृतिक संदेश... अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा!


Image from -social media 

🪷 जिवती पूजन – विशेष पूजन विधी

त्याच दिवशी केली जाते एक खास पूजाः जिवती पूजन.

ह्या पूजेत एका विशिष्ट प्रतिमेचं पूजन केलं जातं – ज्यामध्ये चार वेगवेगळ्या देवतांचे रूप सामावलेले असते:

  1. भगवान नरसिंह – बाळ भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी अवतरलेले. घरातील मुलांवर ओढवणाऱ्या संकटांपासून ते वाचवतात – जसे उंचावरून पडणे, विषबाधा, आग यांसारख्या आपत्ती.
  2. कालियामर्दन श्रीकृष्ण – यमुनेच्या डोहातून चेंडू परत आणताना मुलांचं रक्षण करणारा आणि नागाला अभय देणारा. घराबाहेर खेळताना मुलांवर येणाऱ्या संकटांपासून रक्षा करणारा देव.
  3. जरा व जिवंतिका – यक्षगणातील देवता. 'जरा' हिची महाभारतातील गोष्ट प्रसिद्ध आहे – तिच्या कृपेनेच जरासंधाचा जन्म झाला. 'जिवंतिका' म्हणजेच 'जिवती' – दीर्घायुष्याची कामना करणारी देवी, जी मुलांना पाळण्यात खेळवत असलेल्या रूपात पूजली जाते.
  4. बुध व बृहस्पती (गुरु) – व्यक्तिमत्व घडवणारे ग्रह. बुधाचा अंकुशधारी हत्ती – बुद्धीच्या नियंत्रणाचं प्रतीक. बृहस्पतीचा चाबूकधारी वाघ – अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचं प्रतीक. बुध देतो बुद्धिमत्ता, वाकपटुता – तर बृहस्पती देतो अध्यात्म, विवेक, शिक्षण.


आषाढ, श्रावण, दीपपूजन, जिवती पूजा, हिंदू परंपरा, Marathi Festivals, सणवार
Image from -social media 

🪔🌺 जिवती पूजनाचा गूढ आणि गोड अर्थ

जिवती पूजन म्हणजे मातृशक्तीने पालक व रक्षक शक्तीचं केलेलं पूजन! ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही – ती आहे मुलांच्या आरोग्य, सुरक्षा, आयुष्य आणि उज्ज्वल भविष्याची प्रार्थना.

श्रावण महिन्यात संपूर्ण महिला वर्ग हे पूजन मोठ्या श्रद्धेने करतो. पूजनात गंध, फूल, धूप, दीप, दुधसाखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो.

मुलांना नमस्कार करून त्यांना तीर्थ दिलं जातं. श्रावण संपल्यावर ही प्रतिमा विसर्जित केली जाते.

विशेष: ही प्रतिमा वर्षभर घरात ठेवलं जात नाही – श्रावण अमावास्येला कागद उपडा करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं. श्रावण संपल्यावर ही प्रतिमा घरातील मुलांना दिसता कामा नये, अशी परंपरा आहे.


📿 तर अशा या जिवती पूजनात आहे बालकांचं रक्षण, मातृशक्तीचा आशिर्वाद आणि संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक ऊर्जा!
चला, आपणही ही परंपरा जपूया... दीप उजळवूया... आणि जिवतीचं पूजन करूया!

✨ शुभ श्रावण अमावस्या! ✨

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form